आंतरराष्ट्रीयनवी दिल्लीराजकारणराष्ट्रीयसामाजिक

भारत बनू शकतो जगातील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच ‘ईवाय’च्या रिपोर्टने हुरूप वाढवणारी बातमी दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्था २०३० च्या अखेरीपर्यंत २०.७ ट्रिलियन डॉलरवर पोहचू शकते. तर २०३८ पर्यंत ३४.२ ट्रिलियन डॉलर जीडीपीसह जगातील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते, असा अंदाज ‘ईवाय इकॉनॉमी वॉच’ने व्यक्त केला आहे. ‘पीपीपी’ विनिमय दराने अर्थात क्रयशक्ती समता सूत्राच्या आधाराने हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने आणि वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक पाया भक्कम आहे. यामध्ये उच्च बचत व गुंतवणुकीचे दर, त्याचबरोबर अनुकूल लोकसंख्याशास्त्रीय रचना आणि शाश्वत वित्तीय स्थितीचाही समावेश आहे, अशी निरीक्षणे ‘ईवाय’ने आपल्या रिपोर्टमध्ये नोंदवली आहेत

भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील सर्वात पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. टॅरिफचा दबाव आणि मंदावलेल्या जागतिक आर्थिक व्यापारासारखी अस्थिर आव्हाने असूनही घरगुती मागणीवर अर्थव्यवस्थेची निर्भरता आणि त्याचबरोबर वाढलेली आधुनिक तंत्रज्ञान क्षमता यामुळे अर्थ व्यवस्थेचा पाया भक्कम राहिला आहे.

‘ईवाय’ने ‘पीपीपी’ एक्सचेंज रेटच्या आधारावर हे अंदाज मांडले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेसारख्या संस्था देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना करण्यासाठी ‘पीपीपी’चा वापर करतात.

क्रयशक्ती समता म्हणजे काय?

क्रयशक्ती समता म्हणजे दोन वेगवेगळ्या देशांमध्ये एकाच प्रकारची वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी लागणा-या चलनांच्या प्रमाणाला क्रयशक्ती समता म्हटले जाते. हे चलनांच्या विनिमय दराकडे न पाहता, त्या चलनांमध्ये वस्तू विकत घेण्याची ताकद किती आहे, हे मोजले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page