महाराष्ट्रमुंबई

गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी; दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page