मराठवाडामहाराष्ट्रमुंबईसामाजिक

राज्याला ‘ऑक्टोबर हिट’ची झळ; उकाड्याने नागरिक हैराण

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतली असून नागरिकांना उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागत आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा ताप कायम आहे. पावसाला पोषक वातावरण असून नागरिकांना उन्हाचा चटका सोसावा लागत आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा ओसरला असून, या भागात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती आहे. काल सकाळपर्यंत राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह उकाडा कायम होता. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंश होता तर, दुपारच्या वेळी उन्हाचा प्रकाश तीव्र होता.

रविवारी पहाटे पर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी ३४.५ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूरसह मुंबईतील सांताक्रुझ येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून मुख्यत: उघडिपीसह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मान्सूनने शुक्रवारी १० ऑकटोबर रोजी संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागातून काढता पाय घेतला आहे. अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी, रक्सौलपर्यंत मॉन्सूनच्या परतीची सिमा रविवारी कायम होती. पुढील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page