अंदमान मध्ये समुद्राच्या पाण्याखाली सर्वात मोठा तिरंगा फडकवून नवा जागतिक विक्रम

अंदमान : अंदमान आणि निकोबार बेटांनी शनिवारी ऐतिहासिक कामगिरी करत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. येथील स्वराज द्वीप (पूर्वीचे हॅवलॉक आयलंड) येथे समुद्राच्या पाण्याखाली भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकवून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे.
पाण्याखाली प्रदर्शित करण्यात आलेला हा विशाल तिरंगा ६० मीटर लांब आणि ४० मीटर रुंद होता. या मोहिमेत वन विभाग, मरीन पोलीस आणि खाजगी संस्थांमधील तज्ज्ञ पोहणाऱ्यांसह सुमारे २०० डायव्हर्सनी सहभाग घेतला होता. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा तिरंगा समुद्राच्या तळाशी फडकवण्यात आला.
विशेष म्हणजे, अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल (निवृत्त) देवेंद्र कुमार जोशी यांनी स्वतः डायव्हिंग टीमचा भाग मोहिमेत सहभाग नोंदवला.
अंदमान आणि निकोबार बेटांमधील राधानगर समुद्रकिनाऱ्यावर पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकवून भारताने इतिहास रचला आहे. या कामगिरीबद्दल देशाच्या नावाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली आहे. भारतीय नौदल, पोलीस आणि इतर संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या २२३ पाणबुड्यांच्या (डायव्हर्सच्या) एका पथकाने हे अभियान यशस्वीरित्या पार पाडले.
एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि काटेकोरपणे आखलेल्या मोहिमेद्वारे, स्वराज्य बेटावर (हॅवलॉक बेट) भारताने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. साधारणपणे ६० बाय ४० मीटर आकार असलेला हा विशाल तिरंगा समुद्राच्या तळाशी फडकवण्यात आला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुख्य सचिव चंद्रभूषण कुमार आणि पोलीस महासंचालक एच.एस. धालीवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



